मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्य सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज (१८ जून) विधीमंडळात सादर करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन, सरकारने अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा करुन विविध घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला यावरूनच, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फडणवीस सरकारने घोषणांचा ‘अवकाळी’ पाऊस पाडला असल्याचा खोचक टोला भुजबळ यांनी लगावला.
२०१४ मध्ये सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प होता. आगामी विधानसभा लक्षात घेऊन अर्थसंकल्पात काही लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. यावरूनच, भुजबळ यांनी फडणवीस सरकारवर निशाणा साधला होता. विधानसभेत मांडण्यात आलेला अर्थसंकल्प म्हणजे, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून घोषणांचा ‘अवकाळी’ पाऊस असल्याचा, टोला भुजबळ यांनी लगावला आहे.
राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार अर्थसंकल्प मांडत असताना, त्या आधीच अर्थसंकल्प फुटला अशी चर्चा झाल्यामुळे विधानपरिषदेत गोंधळ उडाला. यावरून भुजबळ यांनी सरकारवर निशाना साधला राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या अनुपस्थित अर्थसंकल्प मांडला गेल्याने सभागृहाची परंपरा पायदळी तुडवली गेल्याचे भुजबळ म्हणाले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारकडून घोषणांचा अवकाळी पाऊस.
राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या अनुपस्थित अर्थसंकल्प मांडला गेल्याने सभागृहाची परंपरा पायदळी#MahaBudget2019 #Budget2019#monsoonsession2019— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) June 18, 2019