नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातही केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी दळणवळणमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर, अशिक्षित युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी पहिलाच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे वाहनचालकाचा परवाना काढण्यासाठी आठवी पास असण्याची आवश्यकता नाही.
याआधी वाहनचालकाचा परवाना काढण्यासाठी ८ वी पास असणे बंधनकारक होते त्यामुळे समाजातील अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या युवकांना इच्छा असूनही वाहनचालक म्हणून रोजगार उपलब्ध होत नव्हता. मात्र, नितीन गडकरी यांनी आठवी पास असण्याचा नियम शिथिल केला आहे. त्यामुळे, यापुढे अशिक्षित किंवा न शिकलेल्या व्यक्तींनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. ट्रान्सपोर्ट क्षेत्रात सध्याच्या परिस्थितीत २२ लाखांपेक्षा अधिक वाहन चालकांची गरज आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात ट्रान्सपोर्ट क्षेत्रात या लोंकाना रोजगार मिळणार आहे.
याबाबत, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी २२ लाखांपेक्षा अधिक वाहन चालकांची गरज असल्याचे म्हंटले आहे.
दरम्यान, मोटार परिवहन अधिनियम १९८९ या कायद्यात सुधारणा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. गडकरींच्या या निर्णयामुळे अशिक्षीत किंवा अडाणी व्यक्तीलाही वाहनचालकाचा परवाना काढता येईल. त्यामुळे बेरोजगारांना चांगली संधी आहे. तसेच ड्रायव्हिंगच्या ट्रेनिंगसाठी देशात २ लाख स्कील सेंटरही उभारण्यात येणार आहेत.
समाज के कम पढ़े-लिखे और गरीब लोग ड्राइविंग से रोजगार की सम्भावना तलाशते हैं। सरकार ने आठवी तक की पढ़ाई की अनिवार्यता हटा दी है जिससे उनकी पढ़ाई के कारण रोजगार न रुके। ट्रांसपोर्ट सेक्टर में भी 22 लाख से अधिक ड्राइवरों की कमी है, इससे लाखों जिंदगीयां बेहतर हो सकती हैं। pic.twitter.com/RVcP2oG139
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) June 18, 2019