अख्खा परिवार प्रचारात उतरुन देखील अशोक चव्हाण यांचा पराभव
नांदेड : (माधव मेकेवाड) बहुजननामा ऑनलाईन – आशोक चव्हाण यांचे वडील माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी बांधलेला विष्णुपुरीचे धरण आणि त्यानंतर आशोकरावांच्या काळात गरुत्तागद्दी सोहळ्याच्या निमीत्ताने नांदेडला आशोकरावांनी आणलेला भरगोस निधि आणि त्यामुळे नांदेडचा बदललेला चेहरा मोहरा हाच फॅक्टर होता की कॉंग्रेसकडे सत्ता असण्याचा. नांदेड शहराला विष्णुपुरीच्या धरणामुळे कधीही मोठ्या प्रमाणात पाण्याची कमतरता पडली नाही. नांदेडच्या लोकांना आपल्या हक्काच पाणी चव्हाण कुटुंबीयांनी पाजल होतं. परंतु १६-नांदेड लोकसभा २०१९ च्या निवडणूकीच्या निकालावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की या आशोकरावांनाच नांदेडच्या मतदारांनी पाणी पाजलं. त्याला कारणही अगदी तसेच आहे.पक्षांतग्रत आसनारे मतभेद, त्या मतभेदांचा पक्षाच्या कार्यकारणीवर झालेला मोठा परिणाम, तरीही संपूर्ण पक्ष हातावर हात ठेवून बसला असल्याने नांदेडच्या जनतेच्या मनातून कॉंग्रेससाठी दार बंद होत गेले. जितकी मेहनत कॉंग्रेसने राष्ट्रवादीसाठी घेतली तितकीच मेहनत राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख नेत्यांनी काँग्रेससाठी घेतली का?
वंचित आघाडीने मध्येच घेतलेली उडी, वंचितला मिळालेली दीड लाखाच्या जवळपासची मते नेमकी कोणाच्या नावावर होती? अशा अनेक कारणांची विचारविमांसा केली तर आशोक चव्हानांचा पराभाव कसा झाला? यावर नांदेड सारख्या किल्ल्यात जोरदार चर्चा होणे अपेक्षित आहेच. काही लोकांना असंही वाटत आहे की, लोकांनी मुख्यमंत्री पदाचा उमेदवार पाडला. यामुळे नांदेडचे नूकसानच झाले आहे. ज्या कुटुंबांनी नांदेडची पायाभरणी केली, नांदेडमधुन दोन वेळा मुख्यमंत्री पद स्विकारले त्याच आशोकराव चव्हाणांना नांदेडकरांनी दूर केलं, म्हणूनच ज्या कुटुंबाने नांदेडकरांना पाणी पाजलं त्याचं नांदेडकरांनी आज त्यांना पाणी पाजलं एवढं मात्र नक्की.