राजेश टोपे (Rajesh Tope) म्हणाले, ‘मुंबईत काल 2200 च्या दरम्यान रुग्ण आढळून आले होते, आज हीच रुग्णसंख्या 4 हजारांच्याजवळ पोहोचलीय. मुंबईत एका दिवशीची आजची पॉझिटीव्हीटी 8.48 एवढी आहे. ठाण्याची 5.25, रायगड 4, पुण्याची 4.14 याचा अर्थ असा आहे की, 100 टेस्टमागे 5 ते 8 पर्यंत रुग्ण आढळून येत आहेत. आजची परिस्थिती नक्कीच चिंता वाढवणारी आहे. टास्क फोर्स आणि इतरांनी जी चर्चा केली. यावरुन अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) घेणार आहेत. आज किंवा उद्या याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. असं टोपे म्हणाले. (Restrictions in Maharashtra)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुढे राजेश टोपे म्हणाले, ‘गर्दी टाळलीच पाहिजे, गर्दी नकोच हाच एक सूर आहे. गर्दीमुळे संक्रमण वाढेल, असेच सर्वांचे मत आहे. गर्दी टाळण्यासंदर्भातच निर्णय होऊ शकेल, असेही टोपे यांनी म्हटलं आहे. टेस्टींग संदर्भात एचडीटीएफ कीटचा वापर करण्याचे ठरले आहे. लसीकरणाबाबतही (Vaccination) निर्णय घेण्यात आला असून 15 ते 18 वयोगटातील तरुणांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी, शाळा किंवा कॉलेज बंद न करता विशेष मोहिमेतून त्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Web Title :- Restrictions in Maharashtra | mumbais positivity rate 848 rajesh tope has-clearly stated about restrictions corona and omicron covid
Kalicharan Maharaj | कालीचरण महाराज नेकमे आहेत तरी कोण? त्यांचा महाराष्ट्राशी काय संबंध?