पुणे बहुजननामा ऑनलाईन – ९३ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये होणार आहे. साहित्य महामंडळाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. मागील आठ वर्षांपासून साहित्य संमेलन मराठवाड्यात घेतलं जावं अशी मागणी केली जात होती. जानेवारी महिन्यात ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे.
उस्मानाबाद येथील विविध संस्था, संघटनांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पक मंगल कार्यालय येथे जाहीर बैठक घेण्यात आली होती. या बैठकित मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबादेत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडावे यासाठी मराठवाड्याच्या साहित्य परिषदेच्या शाखेने गेल्या काही वर्षांपासून पाठपुरावा केला होता. ९३ व्या साहित्य संमेलनासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक, उस्मानाबाद अशा चार ठिकाणांहून संमेलनाची मागणी केली जात होती. त्यात उस्मानाबादचे पारडे जड ठरले.