सांगली बहुजननामा ऑनलाईन – सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यात ब्रम्हानळी येथे पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या परिवाराला प्रत्येकी पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे. सांगलीतील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. त्यांनी हवाई पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात सांगलीतील पूरस्थिती सर्वात भयावह आहे. मात्र पंजाब, गोवा, गुजरात या राज्यातून पथकं दाखल झाले आहेत. मुंबईतून डॉक्टर दाखल होणार आहेत. त्यामुळे घाबरून जाऊ नका. अलमट्टी धरणात विसर्ग वाढविण्यात येणार आहे. अलमट्टी धरणात पाच लाख क्युसेक्स पाणी सोडण्यास कर्नाटक तयार झाले आहे. त्यामुळे सांगलीतील पाणी ओसरण्यास मदत होईल. असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तर आठ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी सोडलं आहे.
एअर लिफ्टिंगचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु दिल्लीतून हेलिकॉप्टरसंदर्भात परवानगी मिळत नाही. राज्य सरकारकडून पूरग्रस्तांना योग्य मदत दिली जाईल असे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पाहणीसाठी मुख्यमंत्रायंसोबत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, एकनाथ शिंदे आदी नेते आले होते.