नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना विषाणू संसर्गाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत. देशातील कोरोनाची प्रकरणे आता 10.50 लाखांच्या जवळपास पोहचली आहेत. कोरोना प्रकरणांबद्दल तज्ञांनी असा अंदाज लावला होता की देशात जुलैच्या चौथ्या आठवड्यात ही संख्या 10 लाखांच्या पुढे जाईल, तथापि, ती 5 दिवस आधीच पूर्ण झाली आहे. अशा परिस्थितीत तज्ञांनी इशारा दिला आहे की, कोरोना रोखण्यासाठी योग्य पावले उचलली गेली नाहीत तर पुढच्या वर्षी जानेवारीपर्यंत कोरोना रूग्णांची संख्या 3 कोटी ओलांडू शकते.
वेगवेगळ्या गणितीय मॉडेल्सच्या आधारे कोरोनावर देखरेख ठेवणाऱ्या तज्ञांनी जून महिन्यातच कोरोनाच्या वाढत्या घटनांविषयी चेतावणी दिली होती. 1 जुलै ते 16 जुलै दरम्यान 5 लाखाहून अधिक कोरोना प्रकरणे उघडकीस आली आहेत. तज्ञांच्या अंदाजानुसार जुलै अखेर हा आकडा एका महिन्यात 7 ते 8 लाखांपर्यंत पोहोचू शकतो.
केरळमधील डेटा तज्ञ जेम्स विल्सन यांचे म्हणणे आहे की देशात केवळ कोरोनामधून बरे झालेल्या रुग्णांचाच डेटा जाहीर केला जात आहे, परंतु परिस्थिती आणखी बिकट होत चालली आहे. ते म्हणाले की कोरोनाचा ग्राफ ज्या पद्धतीने वेगाने वाढत आहे तो पाहता आमच्या टीमने 26 जूनलाच जुलैच्या परिस्थितीचा अहवाल सादर केला. एकट्या जुलै महिन्यातच कोरोना रूग्णांची संख्या सुमारे 8 लाखांपर्यंत वाढणे ही मोठी चिंताजनक बाब आहे. जोधपूर आयआयटीचे माजी प्राध्यापक रीजो एम. जॉन म्हणाले की, देशातील कोरोना रूग्णांची झपाट्याने वाढती संख्या पाहिल्यानंतर सरकारने घेतलेले उपाय सध्या अपुरे आहेत.
कोरोनाची संख्या देशात शिखर गाठत आहे.
दिल्ली एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना प्रकरणांची संख्या जशी झपाट्याने वाढत आहे त्यास पाहिल्यानंतर जरी कोरोना संख्येने अद्याप सर्वोच्च शिखर गाठले असे म्हटले जाऊ शकत नाही, परंतु त्याकडे जाण्याचे हे संकेत नक्कीच आहेत. तसेच सफदरजंग रुग्णालयाचे डॉ. जुगल किशोर सांगतात की आता दहा लाखांचा आकडा पाहून जरी आपल्याला भीती वाटत असेल पण कोरोनाचे शिखर गाठणे अजून बाकी आहे.
जानेवारी पर्यंत कोरोना प्रकरणांची संख्या 3 कोटी होईल
बंगळुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएससी) च्या संशोधकांनीही कोरोनाच्या वेगाने वाढणाऱ्या प्रकरणांचा विचार करता गणितीय मॉडेल सादर केले आहे. आयआयएमसीच्या संशोधकांच्या मते ज्या प्रकारे कोरोना प्रकरणात झपाट्याने वाढ होत आहे त्या आधारे पुढील वर्षी जानेवारीपर्यंत भारतातील रूग्णांची संख्या अंदाजे 3 कोटी असल्याचे समजते. असे सांगितले जात आहे की सप्टेंबरपर्यंत देशात रूग्णांची संख्या जवळपास 35 लाखांच्या जवळपास असू शकते.