मोदी आणि शहा यांची झोप उडवणार ; काँग्रेसचा आम्हाला फायदा नाही : मायावती
लखनऊ : वृत्तसंस्था – आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती आणि समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आघाडी केली आहे. लखनऊ येथे आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली असून दरम्यान उत्तर प्रदेशमधील दोन नेते समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीत दोघांची आघाडी होणार असल्याची शक्यता सर्वत्र वर्तवल्या जात होती. दरम्यान आज झालेल्या पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या तर्फे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी केली आहे. अशी घोषणा करण्यात आली आहे.
इतकेच नव्हे तर उत्तरप्रदेश मध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. दरम्यान बहुजन समाज पार्टी ३८ तर समाजवादी पार्टी ३८ जागा लढवणार असून, २ जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. असे बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोन्ही पक्ष उमेदवार देणार नाहीत. असेही ते म्हंटले.
विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांची या पत्रकार परिषदेमुळे झोप उडाली असेल. याचबरोबर लोकसभा निवडणुकीआधी झालेली ही आघाडी राजकारणात क्रांती घडवेल असेही ते म्हंटले.
बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेससाठी दोन मतदारसंघ सोडला असला तरी भाजपासह काँग्रेसवरही घणाघाती टीका केली आहे. भाजपा आणि काँग्रेसच्या कार्यशैलीत फारसा फरक नाही. स्वातंत्र्यानंतर बराच काळ काँग्रेस पक्ष सत्तेत होता. बहुतांश राज्यांमध्ये त्यांची सत्ता होती. त्यांच्या सत्ताकाळात गरिबी आणि भ्रष्टाचार वाढला. या दोन्ही पक्षांची विचारधारा जवळपास सारखीच आहेअशी टीकाही त्यांनी केली.
विशेष म्हणजे दोन्ही पक्षांनी संरक्षण करारांमध्ये घोटाळे केले आहेत. आधी काँग्रेसनं बोफोर्स घोटाळा केला. त्यामुळे त्यांची सत्ता गेली. आता लवकरच राफेल घोटाळ्यामुळे भाजपाला सत्ता सोडावी लागेल.इतकेच नव्हे तर उत्तर प्रदेशात झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकांमध्ये आम्ही एकत्र आलो होतो. त्यावेळी भाजपाचा पराभव झाला होता. लोकसभा निवडणुकीत त्याचीच पुनरावृत्ती होईल. असेही ते म्हंटले.