पंढरपूर : बहुजननामा ऑनलाईन-सामाजिक व न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज ठाकरेंनी आजपर्यंत उत्तर भारतीयांना कडाडून विरोध केलेला आहे. परंतु त्यांना आता सदबुद्धी मिळाली आहे. त्यामुळे राज ठाकरे आता उत्तर भारतीयांशी जवळीक साधत आहेत. राज ठाकरेंनी यापुढे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहून, उत्तर भारतीयांशी अशीच जवळीक ठेवावी. असे मत व्यक्त केले आहे.
पंढरपूर येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांशी संवाद साधतांना सामाजिक व न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बाबत आपले मत व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांनी आजपर्यंत उत्तर भारतीयांना कडाडून विरोध केलेला आहे. परंतु त्यांना आता सदबुद्धी मिळाली आहे. त्यामुळे राज ठाकरे आता उत्तर भारतीयांशी जवळीक साधत आहेत. राज ठाकरेंनी यापुढे त्यांच्या भूमिकेवर ठाम राहून, उत्तर भारतीयांशी अशीच जवळीक ठेवावी.
इतकेच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठी जनता देखील विविध राज्यात राहते त्यांचे रक्षण होणे गरजेचे आहे. यामुळे राज ठाकरेंनी देखील महाराष्ट्रात इतर प्रांतातून आलेल्या जनतेच्या इतर भाषिक लोकांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे. असेही केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हंटले आहे.
यावेळी महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, रिपाइं ज्येष्ठ नेते सुनील सर्वगोड, विधीतज्ञ कीर्तीपाल सर्वगोड, जिल्हाध्यक्ष अशोक सरवदे आदी उपस्थित होते.