मुंबई : बहुजननामा आॅनलाईन – राज्यात एकूण 72 हजार पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. सदर मेगा भरतीसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे. अशी माहिती समोर आली आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होणार आहे आणि यासाठी पुढच्या आठवड्यात जाहिराती निघणार असल्याचं समजत आहे. मुख्य सचिवांनी मंगळवारी मंत्रालयात यासंदर्भात आढावा बैठक घेतली आहे.
मेगाभरतीचे लाभ काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, सदर नोकरीमध्ये भरती होणाऱ्यांना नियमित शासकीय सेवेचे सर्व लाभ मिळणार आहेत. मुख्य म्हणजे आधी मानधनावर पदं भरली जाणार होती, पण आता सरळ सेवा भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे नवीन पेन्शन योजनाही लागू होणार असल्याचं समजत आहे. सदर पेन्शन योजनेसाठी पगारातून 10 टक्के कापले जाणार आणि तेवढेच पैसे सरकार टाकणार आहे. याशिवाय हे पैसे बँक खात्यात जमा करुन त्याचं व्याज निवृत्तीनंतर दिलं जाणार आहे. इतकेच नाही तर नव्या नोकरदारांना पीएफ आणि ग्रॅच्युईटीही मिळणार आहे. याव्यतिरीक्त घरभाडे भत्ता आणि वाहतूक भत्ता नियमाप्रमाणे मिळणार असल्याचं समजत आहे.
एकूण पदे भरली जाणार – 72 हजार