लखनऊ : वृत्तसंस्था
भाजपाने काँग्रेस अध्यक्षांना या ठिकाणी अडकवून ठेऊ नये म्हणून आम्ही काँग्रेससाठी दोन जागा सोडल्याचे बहुजन समाज पार्टींच्या सर्वेसर्वा मायावती यांनी म्हंटले आहे. लखनऊ येथे आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आघाडीची घोषणा करण्यात आली दरम्यान त्यांनी असे म्हंटले.
आज झालेल्या पत्रकार परिषदेत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांच्या तर्फे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी केली आहे. अशी घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान उत्तरप्रदेश मध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. दरम्यान बहुजन समाज पार्टी ३८ तर समाजवादी पार्टी ३८ जागा लढवणार असून, २ जागा मित्रपक्षांना दिल्या जाणार आहेत. असे बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेठी आणि रायबरेली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी हे दोन्ही पक्ष उमेदवार देणार नाहीत. असेही ते म्हंटले होते.
विशेष म्हणजे, काँग्रेस साठी दोन जागा का सोडल्या याचा खुलासाही त्यांनी केला आहे. काँग्रेस आमच्या आघाडीचा भाग नाही. मात्र तरीही रायबरेली आणि अमेठी मतदारसंघ त्यांना सोडण्याचा निर्णय आम्ही घेतला. काँग्रेस अध्यक्षांना भाजपानं या ठिकाणी अडकवून ठेऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला. असे मायावती यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर, या आघाडीत काँग्रेसला सामील करुन घेतलं जाईल, अशी चर्चा होती. मात्र भाजपाला आव्हान देण्यासाठी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी समर्थ असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.