यशवंत सेनेचे अध्यक्ष माधव गडदे याबाबत वक्तव्य करताना म्हणाले की, “सत्तेवर येण्यापूर्वी विरोधी बाकावरील देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मराठा आरक्षण मंजूर होईपर्यंत मेगाभरतीला स्थगिती देण्यात आली होती. त्याचप्रमाणे मराठा समाजापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या धनगर समाजाची आहे.”
इतकेच नाही तर पुढे ते असंही म्हणाले की, “धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे दाखले मिळाल्यास सुमारे दीड कोटी समाज बांधवांना त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.” आणि यामुळेच , मेगाभरतीला स्थगिती द्या अशी मागणी गडदे यांनी केली आहे. विशेष म्हणजे जर मेगा भरतीला स्थिगिती दिली नाही तर जिल्हानिहाय यशवंत सेनेकडून होणाऱ्या विरोधाला सरकार जबाबदार असेल, असा इशाराही गडदे यांनी दिला आहे.
मेगा भरतीविषयी थोडक्यात…
राज्य शासनाच्या विविध विभागातील 72 हजार पदे भरण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. त्यातील 36 हजार पदे यंदा पहिल्या टप्प्यात भरण्यास त्यांनी मान्यता दिली. उर्वरित 36 हजार पदेही लवकरच भरण्यात येणार आहेत. राज्यातील प्रशासनाच्या विविध विभागात गेल्या अनेक वर्षांपासून पदे रिक्त आहेत. शासनाच्या या रिक्त जांगांच्या भरतीच्या प्रकियेला सुरुवात झाली आहे. एकूण 72 हजार पदांची मेगा भरती असून दोन टप्प्यात ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे. त्यापैकी 36 हजार पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली असून प्रामुख्याने कृषी व ग्रामविकास विभागातील पदे भरली जाणार आहेत. फेब्रुवारी महिन्यातील पहिल्या आठवड्यात या भरती प्रक्रियेसाठी परिक्षा घेण्यात येणार असून पुढील आठवड्यात यांसदर्भातील जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचं समजत आहे.