अकोला : बहुजननामा ऑनलाइन – आजच्या महिलांनी उपवास व्रतवैकल्ये बाजूला ठेवून विज्ञानवादाची कास धरावी. चुल आणि मुल या गर्तेतून बाहेर येऊन क्रांतिज्योती सावित्रीमाईंच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे येण्याचा जरा जरी प्रयत्न केला तर चांगली पिढी घडविण्याचे कार्य पुढे नेता येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध विचारतज्ञ प्रा. सुषमा अंधारे यांनी केले. मूर्तिजापूर येथे सावित्रीबाई फुले जयंती निमित्त ‘सावित्री काल आणि आज’ या विषयावर ३ जानेवारी रोजी आयोजित व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होत्या. या गुलामगिरीतून बाहेर पडण्याची क्षमता तुमच्यात निर्माण करुन ही बंधने झुगारून टाकण्याचे आवाहनही प्रा.अंधारे यांनी यावेळी उपस्थित महिलांना केले.
अध्यक्षस्थानी अमरावतीचे प्रविण ढवळे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर, जिल्हा परिषद सदस्य संजय आष्टीकर, डॉ. संतोष गहुकार, प्राचार्य श्रावण रणबावळे, शिवसेना तालुका प्रमुख अप्पु तिडके, संदीप जळमकर, रवि राठी, उपसभापती उमेश मडगे, रितेश मडगे, जयश्री मेहरे, प्रणिता मारोटकर, करुणा बोबडे, सविता दहीकर, झिंगुताई बोलके, दिपाली ठाकरे, कैलास महाजन, गजानन नाकट, वासुदेवराव बोळे, निजामोद्दी, दिपकराज डोंगरे, विजय टोहरे, संदीप जळमकर, अमोल राखोंडे, सुयश श्रीखंडे, भारत भगत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन महात्मा फुले सार्वजनिक जयंती उत्सव समिती यांनी केले होते. प्रास्ताविक श्रीकृष्ण बोळे यांनी तर संचालन निलेश मेहरे आणि संदीप काळपांडे यांनी केले, आभार किशोर टाक यांनी मानले.