नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन –आगामी लोकसभा निवडणुकीकडे लक्ष देता सर्व विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी २२ नोव्हेंबरला आयोजित केलेली बैठक रद्द करण्यात आली आहे. मिळालेल्या सूत्रांच्या माहिती नुसार ही बैठक पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुळे रद्द करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री तसेच तेलगू देशम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू आगामी लोकसभा निवडणुकी साठी भाजपाच्या विरोधातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत. ज्यामध्ये पश्चिम बंगाल च्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा सहभाग महत्वपूर्ण मानल्या जात आहे. परंतु ममता बॅनर्जी यांनी या बैठकीला अद्यापही सहमती दिलेली नाहीये. विशेष म्हणजे सूत्रांच्या मिळालेल्या माहिती नुसार आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे ममता बॅनर्जी यांची भेट घेणार आहेत आणि नंतर पुढच्या बैठकीची तारिक ठरवणार आहेत.
विशेष म्हणजे आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी भाजपा विरोधी सर्व पक्षांना एकत्र आणण्याची जिम्मेदारी घेतली आहे. याआधी त्यांनी अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते अशोक गहलोत यांची भेट घेतली होती. त्यावेळी भाजपा विरोधातील सर्व मोठे पक्ष २२ नोव्हेंबरला दिल्ली येथे बैठक घेऊ असे ठरण्यात आले. या बैठकीत नोटबंदी, सीबीआई, अश्या अनेक विषयांवर चर्चा होणार होत्या.
इतकेच नव्हे तर चंद्राबाबू नायडू यांनी अनेक नेत्यांसोबत भेट घेतली होती, हि बैठक ममता बॅनर्जी यांच्या त्या निर्णया नंतर ठरविण्यात आली आहे. त्यांनी आंद्रप्रदेश सारखच स्वतःच्याही राज्यात प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला प्रवेश बंदी करण्यात आली होती.