गुजरात : वृत्तसंस्था – भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयम सेवक संघ यांनी बहुजन समाज पार्टी च्या सरकारच्या काळी बनवण्यात येत असलेल्या पुतळ्यांना अनावश्यक खर्च असे आहे सांगितल्याने बहुजन समाजाच्या लोकांची माफी मागावी. असे बहुजन समाज पार्टीच्या सर्वे सर्वा मायावती यांनी म्हंटले आहे.
गुजरात मध्ये ‘स्टैच्यू ऑफ यूनिटी’ चे लोकार्पण झाल्या नंतर भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंती निमित्त आदरांजली देत असतांना त्या भाषणा वेळी म्हंटल्या की जवळ जवळ ३ हजार करोड रुपये लावून बनवण्यात आलेली सरदार वल्लभ भाई पटेल यांची ‘स्टैच्यू ऑफ यूनिटी’ पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरात मध्ये लोकार्पण झाल्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी बहुजन समाजाच्या लोकांची माफी मागितली पहिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच अन्य दलित समाजाच्या महान पुरुषांच्या आदरार्थ बहुजन समाज पार्टी च्या सरकारच्या काळी लखनौ आणि नोएडा मध्ये स्थापन झालेल्या भव्य स्थळांना , पुतळ्यांना, उद्यानांना अनावश्यक खर्च म्हणून टोमणे मारत होते.
याचदरम्यान मायावती म्हंटल्या की, सरदार वल्लभ भाई पटेल हे आपल्या बोलण्या – चालण्यातून, रहाणीमानातून संपूर्ण भारतीय संस्कृतीची एक ओळख होते. मात्र त्यांचे भव्य स्मारकाचे नामकरण हे हिंदी आणि भारतीय संस्कृती च्या जवळ असलेल्या भाषां असतानाही त्यांनी स्टैच्यू ऑफ यूनिटी असे इंग्लिश नाव ठेवणे हे कोणते राजकारण आहे. हे सर्व राजकारण देशाची जनता बघत आहे.
इतकेच नव्हे तर सरदार वल्लभ भाई पटेल हे भारतीय संस्कृतीचे आणि सभ्यतेचे जनक होते. परंतु त्यांच्या पुतळ्यावर विदेशी निर्मितीची छाप हि त्यांच्या समर्थकांना नेहमी त्रासदायक ठरेल. इतकेच नव्हे तर बहुजन समाज पार्टी च्या सर्वे सर्वा मायावती यांनी म्हंटले की , आंबेडकरांन सारखेच सरदार वल्लभ भाई पटेल हे एक राष्ट्रपुरुष होते. त्यांचा आम्हला आदर आहे. मात्र भाजपा आणि आरएसएस यांनी त्यांना आपल्या क्षेत्रवादात बांधून ठेवले आहे.
याचबरोबर ते म्हंटले की, देशाच्या जनतेला या सर्व गोष्टी समजून घेत नाहीये. भाजपाला खरच सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या नावावर राजकारण करणे सोडून त्यांना खर्च त्यांच्या बद्दल आदर होता तर त्यांनी गुजरात मध्ये बऱ्याच वर्षांपासून चालत आसलेल्या सरकारच्या वेळी अशी भव्य प्रतिमा का नाही बांधली असा सवालही त्यांनी केला.