नागपूर : बहुजननामा ऑनलाईन – बारी समाज नागपूरच्या मंडळ स्थापनेस नुकतीच २६ डिसेंबर २०१८ ला ५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून समस्त बारी / बारई समाजाने बाईक रॅलीचे आयोजन केले होते.
रॅलीत समाज बांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आपल्या एकतेचे प्रदर्शन घडविले. बाइक रॅली नागपुरातील समाज बांधवांचे मूळ स्थान लालगंज बारीपुरा इतवारी येथील महारूद्र मारुती देवस्थान येथून पूजा अर्चा करून बारीपुरा जयस्तंभ चौक, राऊत चौक, मस्कासाथ पुलामार्गे शहीद चौक, सराफा ओळ, गांधी पुतळा चौक, केळीबाग रोड मार्गे रेशीमबाग मैदानात समाप्त झाली. बडकस चौक येथे रॅलीचे स्वागत आमदार गिरीश व्यास यांनी केले. याप्रसंगी त्यांनी समस्त बारी समाजास त्यांच्या सामाजिक उन्नतीकरिता शुभेच्छा दिल्या.
रॅलीच्या समारोपप्रसंगी नगरसेविका दिव्या धुरडे, मंडळाचे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, सचिव अरुण भोपळे, माजी अध्यक्ष पुंडलिकराव संभे, महाराष्ट्र बारी/ बारई समाज अध्यक्ष सुरेश राऊत, सचिव ॲड. आकाश राऊत, रमेश भंडारी, राजेश हडप, चंद्रकांत पोटे, भारतीय बारी/बारई समाज मंडळाचे अध्यक्ष रमेश गोन्नाडे, पान मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. विष्णूपंत दारव्हेकर व सचिव अविनाश भोपळे व माजी नगरसेवक दीपक धुरडे, किशोर भोज व सर्व शाखांतील पदाधिकाऱ्यांनी यापुढे एकत्र येऊन समाजाच्या विकासासाठी काम करण्याचा निश्चय केला.
रॅलीच्या यशस्वी आयोजनाकरिता वामनराव धुळे, सुरेंद्र केदार, मिलिंद बोकरडे, बाबाराव दारोकर, सत्येन दाढे, सुभाष तोटे, प्रवीण धर्मे, मधुकरराव पोटे, मोहन बोकरडे, सुधीर बेहरे, प्रदीप केदार, सुभाष चिरडे, भुषण धर्मे, गौरव केदार आदींनी बहुमूल्य योगदान दिले.