मनमाड : बहुजननामा ऑनलाइन – मनमाड शहर रिपाई युवा शाखेच्या वतीने महानगरपालिके समोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आसून, आंदोलनाच्या दुसर्या दिवशी ढोल बजाव हे अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. शासनाकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या रमाई घरकुल योजनेच्या लाभापासून अनेक लाभार्थी वंचीत असून याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.
शासनाकडून मागासवर्गीय जनतेला हक्काचा निवारा मिळावा म्हणून रमाई घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे. मात्र पालिका प्रशासन व समाज कल्याण विभाग यांच्या अनागोंदी कारभारामुळे अनेक लाभार्थी रमाई घरकुल योजने पासून वंचित आहेत. दरम्यान मनमाड रिपाई युवा शाखेच्या वतीने महापालिकेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर आंदोलन सुरु होऊन दोन दिवस झाले तरी शासनाने या कडे लक्ष दिले नाही म्हणून आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी रिपाई युवा शाखेच्या वतीने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ढोल बजाव हे अनोखे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान संघटनेच्या वतीने आपल्या मागण्याचे निवेदन प्रशासणाला देण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर जोपर्यंत लाभार्थ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशाराही निवेदनात करण्यात आला आहे. यावेळी रिपाई चे जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र अहिरे, जिल्हा कार्याध्यक्ष गंगाभाऊ त्रिभुवन, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश अहिरे ,युवा शहराध्यक्ष गुरु कुमार निकाळे, प्रमोद अहिरे, दिलीप नरवडे, सुशील खरे, कैलास अहिरे, महेंद्र वाघ, सुरेश जगताप, बाबा शेख, रवी खैरनार,राजू ढेंगे, दिनकर कांबळे, पापा शाह, धनंजय अवचारे, पांडुरंग पगारे, दिनेश झोडपे. आदी उपस्थित होते.