नांदेड : बहुजननामा ऑनलाइन – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांच्याशी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी चर्चा झाली आहे. मात्र अद्यापही काँग्रेसचा कोणताही प्रस्ताव आला नाही. संदर्भात अजूनही चर्चा सुरू आहे. असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
भारिप बहुजन महासंघाच्या वतीने आज ( १७ जानेवारी ) नांदेड येथे वंचित बहुजन आघाडी सत्ता संपादन महासभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान पत्रकार परिषदेत काँग्रेसकडून आघाडीबाबत अद्याप अधिकृत प्रस्ताव आला नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व ४८ जागा लढवण्याच्या तयारीत आहे़ यामध्ये एमआयएमही आमच्या सोबत आहे. असे भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे. इतकेच नव्हे तर त्यावेळी काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी एमआयएमला बाजूला करण्याची अट घातली जात आहे असे विचारले असता. काँग्रेस अनेक ठिकाणी भाजपासोबत सत्तेत विराजमान आहे. काँग्रेसने भाजपाला सर्वप्रथम सोडावे, नंतर आमच्यावर टीका करावी. असेही ते म्हंटले. याचबरोबरोबर बहुजन वंचित आघाडीचा आरएसएसला असलेला हा विरोध सैद्धांतिक आहे, त्यामुळे आरएसएस व्यक्तिगत, धर्मस्वातंत्र, लोकशाहीला नकार देते तर मनुवादी व्यवस्थेचा पुरस्कार करते़ यामुळे आमचा त्यांच्या विचाराशी लढा आहे़. असेही ते म्हंटले.
इतकेच नव्हे तर प्रकाश आंबेडकर लोकसभेवर गेले पाहिजे अशी काँग्रेसची इच्छा असल्याच्या वक्तव्याबाबत विचारले असता काँग्रेसने २००४ पासून सातत्याने आपल्या विरोधात उमेदवार दिले आहेत. असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर काँग्रेसचे हे प्रेम दुटप्पी आहे़ असाच दुटप्पीपणा आ़जोगेंद्र कवाडे हेही दाखवित आहेत. असेही ते म्हंटले. याचबरोबर एमआयएमचे आ. इम्तियाज जलील यांनीही यासंदर्भात मराठा आरक्षण विरोधात याचिका दाखल केल्यासंदर्भात माहिती देताना मराठ्यांना विविध समित्यांच्या शिफारशीवरील आरक्षण दिले गेले़ पण मुस्लिमांच्या आरक्षणासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या अनेक समित्यांचे अहवाल सरकारने स्वीकारलेच नाहीत़ काँग्रेस आघाडीच्या काळातही मुस्लिम आरक्षण संदर्भात अनेक समित्यांचे अहवाल प्राप्त झाले होते़ मात्र ते बाजूला टाकण्यात आल्याचेही त्यांनी म्हंटले.