अहमदनगर : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. नोटबंदी, जीएसटीमुळे उद्योग व्यवसास कोलमडून पडत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी विकास महामंडळाकडून ज्या लाभार्थ्यांनी कर्ज घेतले आहे ते पूर्ण माफ करावे, अशी मागणी बाराबलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली आहे.
ओबीसी महामंडळाचे प्रांताध्यक्ष कल्याणराव दळे यांच्या नेतृत्वाखाली एकाच दिवशी राज्य सरकारकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्याचे ठरले होते, त्याप्रमाणे महासंघाच्यावतीने उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांना निवेदन देण्यात आले.
बाराबलुतेदारांचा व्यवसाय सध्याच्या परिस्थितीत अक्षरश: कोलमडून पडले आहे. गेल्या तीन वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीत जगणे कठीण झाले आहे. व्यवसायाला जोडधंदा नसल्यामुळे ओबीसी समाज बेकार होत आहे. घेतलेले कर्ज फेडण्यासाठी पूर्णत: व्यावसायिक असमर्थ असल्याने ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या लाभार्थ्यांचे कर्ज पूर्ण माफ करावे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर बाळासाहेब भुजबळ, जालिंदर बोरुडे, बापूसाहेब औटी, प्रमोद गुरव, मनिषा गुरव, रमेश बिडवे, वनिता बिडवे, संदिप घुले, सागर नांदूरकर, अमोल भंडारे, प्रशांत वाकचौरे, सागर साळूंके, राजू ताकपिरे, नंदू वाघमारे, सचिन सानप, गौरव तापकिरे, शिवाजी दळवी, नामदेव गायकवाड, सोमनाथ कदम, मल्हारी गिते, विजय पानमळकर, प्रतिक पवार, स्वप्नील नांदूरकर, निलेश पवळे आदिंच्या सह्या आहेत.