पुणे : बहुजननामा ऑनलाइन – चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सरकारने भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना जाऊ दिले नाही, ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे, असे म्हणत. महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी सुरु झाली आहे काय ? असा सवाल आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केला.
भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सरकारने जाऊ दिले नाही. दरम्यान ही निषेधार्थ बाब आहे. संविधानिक मूल्यांची पायमल्ली आहे. याचबरोबर कोरेगाव भीमा येथे ऐतिहासिक विजयस्तंभाला आभिवादन करण्यासाठी भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना जाऊ देण्यापासून सरकार अटकाव करत आहेत. असा आरोप आमदार कपिल पाटील यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात अघोषित आणीबाणी सुरु झाली आहे काय ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
विशेष म्हणजे त्यावेळी बोटाना त्यांनी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे हे बाहेर मोकाट फिरत आहेत. मात्र संविधानाला मानणारे सभा घेऊ शकत नाहीत. त्यांच्यावर सरकार अटकाव करते. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मिलीं होत आहे असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरु केलेल्या परंपरेला कुणी खंडित करू नये. इतकेच नव्हे तर सरकारने भीमा कोरेगावला जाण्यापासून कोणालाही अटकाव करू नये. अन्यथा सरकारला जनतेच्या उद्रेकाला तोंड द्यावे लागेल.