नांदेड : बहुजननामा ऑनलाईन – प्रकाश आंबेडकरकांच्या वंचित बहुजन आघाडीला सीपीआय, सीपीएमसारखे डावे पक्ष चालतात. परंतु रिपब्लिकन चालत नसल्याचे दिसत आहे. अजूनतरी आघाडीसाठी आमच्यापर्यंत कोणताही प्रस्ताव आला नाही. मात्र प्रकाश आंबेडकरांनीं प्रस्ताव दिल्यास विचार करू असे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले. मंगळवारी नांदेड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संवैधानिक संस्थांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढला आहे. आमच्या कलेनेच वागले पाहिजे असा दबाव निर्माण केला जात आहे. त्यामुळे देशातील एकसंघतेला धोका निर्माण झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी देशात महाआघाडी केली जात आहे.. कॉंग्रेसला आम्ही राज्यात पडत्या काळात साथ दिली आहे. नांदेड महानगरपालिकेतही काँग्रेसला आमच्या साथीमुळेच बहुमत मिळाले. त्यामुळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीला स्विकृत सदस्यांच्या पाच जागांपैक एक जागा द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली़ प्रकाश आंबेडकर यांच्याकडून वंचित बहुजन आघाडीसाठी कोणताही प्रस्ताव अद्याप आलेला नाही. परंतु तसा प्रस्ताव आल्यास विचार करू. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडीची बोलणी सुरू असून दोन जागांची मागणी केली आहे. असे ते म्हणाले. असेही ते म्हणाले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बापुराव गजभारे, गणेश उनवणे, शशीभाई उनवणे, विनोद भरणे, कुलदीप चिकाटे आदींची उपस्थिती होती़
ईव्हीएमसारखी मतदान प्रणाली प्रगत देशांनी बंद केली आहे. लोक शंका घेत असतील तर निवडणूक आयोगाने ती बंद करून बॅलेट पेपरवर मतदान घ्यावे, इव्हीएम बंद करण्यासाठी आम्ही मोर्चे काढले. गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूची चौकशी सीबीआयमार्फत करावी असेही ते म्हणाले.