चंद्रपूर : बहुजननामा ऑनलाइन – (बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्ष) पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट हमीभाव देण्यात यावा, शेतकऱ्यांना दरमहा ५००० रु पेन्शन देण्यात यावे, जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी उपलब्ध कराव्यात, गावरान गायठान जमिनीचा प्रश्न तात्काळ सोडवावेत, कृषीपंपाना मोफत विद्युत देण्यात यावी, स्वामीनाथन आयोग लागु करावा, शेतकऱ्यांना विनाअट शेतीकर्ज देण्यात यावे, जमिन हद्द कायम मोजमापणी करुन द्यावी, अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते.
“बिआरएसपी” पार्टीचे कार्यकर्ते व जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पक्षाचे विदर्भ अध्यक्ष दशरथ मडावी आणि महासचिव राजू झोडे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांना निवेदन देण्यात आले.