अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – माजी खासदार सुभाषिनी अली यांच्या अध्यक्षतेखाली धर्मदाय कॉटन फंड परिसरात जनवादी संघटनेचे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनानिमित्त राज्यातील ३० जिल्ह्यातून संघटनेचे प्रतिनिधी अमरावतीत आले होते. शुक्रवारी नेहरू मैदान येथून संघटनेच्या सदस्यांनी राजकमल चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक येथून धर्मदाय कॉटन फंडपर्यंत मोर्चा काढला. याठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी खासदार सुभाषिनी अली, राष्ट्रीय अध्यक्षा मालिनी भट्टाचार्य, महासचिव मरियम ढवळे, प्रदेशाध्यक्ष सोन्या गिल, राज्य सचिव नसीमा शेख यांनी उपस्थितांना संबोधित केले.
सध्याचा काळ हा समाज व्यवस्थेसाठी अतिशय घातक असा काळ आहे. महिलांच्या प्रश्नावर विद्यमान सरकारचे अजिबात लक्ष नाही. महिलांवरील अन्याय अत्याचाराचे मोट्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळते. जातीवाद, धर्मवाद फोफावला आहे. महिलांसह समाजाच्या हितासाठी मोदी सरकार घातक असून, मोदी सरकार चाले जाव आशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. येणाऱ्या काळात परिवर्तन घडविण्याचा संकल्प यावेळी उपस्थित महिलांनी घेतला.