पुणे : बहुजननामा ऑनलाइन – ब्राह्मणवाद्यांकडून महाराष्ट्रात एस्सी – मराठा समाजात भांडण लावण्याचे काम सुरु आहे, याचबरोबर महाराष्ट्रात बहुजनवाद्यांचे सरकार आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वक्तव्य चंद्रशेखर आझाद यांनी केले आहे.
चंद्रशेखर आझाद यांनी पुणे येथील सभेसाठी मागणी केली होती मात्र, उच्च न्यायालयाने त्यांच्या पुण्यातील सभेला परवानगी नाकारली दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत आहे. परंतु कोरेगाव – भीमा दंगलीतील आरोपी संभाजी भिडे, एकबोटे, यांच्यावर कारवाई केली जात नाही. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात हुकूमशाही सुरु असून एस्सी – मराठा समजत भांडण लावण्याचे काम ब्राह्मणवाद्यांकडून सुरु आहेत.
याचबरोबर आगामी काळात महाराष्ट्र्रत भीम आर्मी संघटनेचे जाळे मजबूत करणार आहेत. १ जानेवारी २०१८ मध्ये कोरेगाव – भीमा येथे झालेल्या दंगलीनंतर पूजा सकट या मुलीची स्वहत्या नसून हत्याच आहे. तिच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्यांना पोलिसांनि अद्यापही अटक केली नाही असेही त्यांनी म्हंटले.