मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचा आदर करुन सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यावा, अशी भूमिका मांडली होती यावर एमआयए प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी टीका केली आहे. दरम्यान हिंदू भावनेच्या आधारे सुप्रीम कोर्ट निर्णय देऊ शकत नाही असेही ते म्हंटले.
शुक्रवारी भाईंदर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पत्रकार परिषदेत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी राम मंदिराबाबत भाष्य केले होते. ते म्हणाले की , राम मंदिर व्हावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे. पण प्रकरण न्यायालयात असल्याने विलंब होत आहे. हा कोट्यवधी हिंदूंच्या भावनेचा विषय आहे. हिंदूच्या भावनेचा आदर करुन सुप्रीम कोर्टाने निर्णय द्यावा. सुप्रीम कोर्टाने तातडीने या प्रकरणावर सुनावणी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पत्रकार परिषदेत सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी केलेलया विधानावर एमआयएम प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विटरवरुन टीका केली आहे. हिंदू भावनेच्या आधारे सुप्रीम कोर्ट निर्णय घेऊ शकत नाही. ते अजूनही भारताच्या संविधानाला मानायला तयार नाही. संविधानात आस्था, भावनेला स्थान नाही. इथे फक्त न्याय मिळतो असे त्यांनी म्हंटले आहे.
विशेष म्हणजे राम मंदिर प्रकरणात अध्यादेश आणून दाखवाच असे खुले आव्हान ओवेसी यांनी भाजपाबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि विश्वहिंदू परिषदेच्या सर्व नेत्यांना दिले होते. याचबरोबर ओवेसी यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरुन वारंवार भाजपा व संघावर टीका करत असतात.