सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यात यावा याला विरोध झाला असतांनाच , मंत्री कमिटीतील मंत्री बैठकीला गैरहजर असताना नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला गेला असा आरोप शिवा आखिल भारतीय वीरशैव संघटने तर्फे करण्यात आला आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्यात यावे अशी मागणी झाली होती मात्र त्याला विरोध झाला होता. यादरम्यान मुख्यमंत्र्यांच्या कमिटीचा फार्स राज्य सरकारने केला मात्र त्यावेळी मंत्री बैठकीला गैरहजर असताना नामांतराचा प्रस्ताव मंजूर केला गेला असा आरोप शिवा आखिल भारतीय विसरशैव संघटनेने केला आहे.
विशेष म्हणजे राज्य सरकारने नामांतराच्या प्रश्नावर मंत्री उपसमिती स्थापन करून सर्व संबंधित राजकीय सामाजिक संघटना आणि अन्य घटकांची चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही दिली होती परंतु अशी बैठक झाली नसल्याचा आरोपही शिवा आखिल भारतीय विसरशैव संघटनेने केला आहे. इतकेचं नव्हे तर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली असली तरी त्या दिवशी महादेव जानकर गिरीश बापट आणि राम शिंदे हे मंत्री राज्यातील विविध ठिकाणी दौऱ्यावर होते, अशी माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. या बैठकीचा इतिवृत्तांत तसेच अहवालही बनावट तयार केल्याचा आरोपही शिवा आखिल भारतीय वीरशैव संघटनेने केला आहे. तसेच एकही सामाजिक संघटना नसल्याने ही बैठक झाली नाही केवळ त्याचा बनाव केला आहे असा आरोपही त्यांनी केला.
शिवा अखिल भारतीय वीरशैव व युवक संघटनेचे संस्थापक प्रा.मनोहर धोंडे, सतीश तळेकर, शैलेजा कापूरकर, सुधीर हल्ली यांनी उच्च न्यायालयात यासंदर्भांत याचिका दाखल केली आहे.