बहुजननामा ऑनलाईन – भारतात आत्महत्यांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. २०१९ मध्ये दर चार मिनिटाला एकाने आपला जीव दिला. यापैकी ३५ टक्के सेल्फ-एम्प्लॉईड होते. बहुतेक लोक कौटुंबिक अडचणींमुळे जीव देतात, तर १७% लोक आजारपण झेलण्यापेक्षा मृत्यू होणे चांगले मानतात. मागील दशकाच्या तुलनेत या दशकात आत्महत्या वाढल्या आहेत. चेन्नई, बेंगळुरू, दिल्लीसारख्या शहरांमध्ये आत्महत्येचा दर जास्त आहे. आकडेवारी पाहिल्यास हे देखील दिसून येते की, माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेत असलेले लोक जास्त आत्महत्या करत आहेत.
दर लाख लोकसंख्येत आत्महत्या कमी झाली
गेल्या दशकभरात दर लाख लोकसंख्येवर आत्महत्येचा आकडा कमी झाला आहे. २००९ मध्ये ज्या राज्यांची परिस्थिती अत्यंत वाईट होती, त्यात सुधारणा झाली आहे. सिक्किममध्ये एक लाख लोकसंख्येवर ३३.१ लोक आत्महत्या करत आहेत, तर बिहारमध्ये हा दर सर्वात कमी (०.५) आहे.
या मोठ्या शहरात परिस्थिती चिंताजनक
भारतात १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोल्लममध्ये आत्महत्या करण्याचे प्रमाण सर्वात जास्त (४३.१ दर लाख) आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमधील आसनसोल (३७.८) चा क्रमांक येतो. महानगरांमध्ये चेन्नईत सर्वाधिक लोकांनी आत्महत्या केली.
दर तीनपैकी एका आत्महत्येमागे कौटुंबिक समस्या
भारतात आत्महत्यांचे सर्वात मोठे कारण म्हणजे कौटुंबिक अडचणी आहेत. पण अंमली पदार्थांचे सेवन आणि दारूच्या नशेमुळेही आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
स्वयंरोजगार असणाऱ्यांची संख्या अधिक
२०१९ च्या आकडेवारीनुसार आत्महत्या करणाऱ्यांमध्ये ३५% स्वयंरोजगार लोक होते. गृहिणींची संख्या १५.४% होती, तर ९.१% नोकरी करणारे होते.
उच्च माध्यमिकपर्यंत शिक्षण घेणारे करतात जास्त आत्महत्या
आकडेवारीनुसार, अशिक्षित लोकांच्या आत्महत्यांमध्ये घट झाली आहे. शिक्षणाच्या सर्व स्तरांवर आत्महत्यांचे प्रमाण कमी झाले आहे, पण २००९ च्या तुलनेत मॅट्रिक आणि उच्च माध्यमिकपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे.