नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतातील व्यवसायिक सहजतेच्या वातावरणावर परिणाम पडू शकतो. कारण, जागतिक बँकेने व्यवसायिक सहजता रँकिंग रिपोर्ट रिव्ह्यू करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील 5 वर्षांच्या दरम्यान भारत या रॅकिंगमध्ये 67 अंकाची उडी घेत 63व्या स्थानावर पोहचला आहे. गुरूवारी जागतिक बँकेने याबाबत वक्तव्य जारी करून म्हटले आहे की, ऑक्टोबरमध्ये जारी होणारा व्यवसायिक सहजता रँकिंग रिपोर्ट स्थगित करण्यात आला आहे आणि मागील 5 वर्षातील आकडे रिव्ह्यू केले जातील. जागतिक बँकेला हा रिपोर्ट तयार करण्याच्या प्रक्रियेत अनेक प्रकारच्या अनियमिततांची माहिती मिळाली आहे. वक्तव्यात म्हटले आहे की, रिव्ह्यूच्यानंतर समोर आलेल्या परिणामांच्या आधारावर आम्ही कोणताही निर्णय घेऊ. या अनियमिततांमुळे ज्या देशांच्या आकड्यांवर काही परिणाम होण्याची बाब समोर आली तर पूर्वलक्षी दृष्ट्या ते ठिक करू.
मागील काही वर्षात वादात सापडलाय हा रिपोर्ट
जागतिक बँकेचा सर्वात चर्चित हा रिपोर्ट मागील काही दिवसात खुपच वादात सापडा होता. जानेवारी 2018 मध्ये या बँकेचे माजी मुख्य अर्थतज्ज्ञ पॉल रोमर यांनी राजीनामा देताना दावा केला होता की, आकडे जमवण्याच्या रितसर कार्यप्रणालीत बदलामुळे या रिपोर्टमध्ये चिलीचे रँकिंग कमी झाले होते. मागील 4 वर्षांच्या रिपोर्टचे रिव्ह्यू केल्यानंतर सर्व रँकिंगला नव्याने सादर करण्यास रोमर इच्छूक होते. परंतु, या दरम्यान त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
भारताच्या रँकिंगवर होऊ शकतो परिणाम
हे दोन्ही वाद आता इशारा करतात की, भारताच्या रँकिंगवर सुद्धा नव्या रिव्ह्यूमध्ये परिणाम होऊ शकतो. लाइव्हमिंटने आपल्या रिपोर्टमध्ये 2012 ते 2016 च्या दरम्यान जागतिक बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ असलेले कौशिक बासु यांच्या संदर्भाने लिहिले आहे की, भारताला आकड्यांच्या रिसतर कार्यप्रणालीत बदलाने लाभ मिळाला आहे. 2016 आणि 2017 मध्ये भारताचे रँकिंग 130 वरून वाढून 100व्या स्थानावर आले होते. या दोन्ही वर्षात चिलीच्या रँकिंगमध्ये घसरण झाली होती.
रँकिंग सुधारण्यावर केंद्राचा विशेष फोकस
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात भारताचे रँकिंग 2014 मध्ये 142 हून चांगले होऊन 2019 मध्ये 63व्या स्थानावर पोहचले आहे. केंद्र सरकार लागोपाठ व्यवसायिक सहजतेचे रँकिंग चांगले करण्यासाठी पावले उचलत आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी नुकतेच म्हटले होते की, भारताला पुढील वर्षापर्यंत या रॅकिंगमध्ये टॉप 50 सहभागी करावे लागेल.
विरोधकांनी साधला निशाणा
जागतिक बँकेच्या वक्तव्यानंतर विरोधी पक्षांनी केंद्र सरकारच्या व्यवसायिक सहजता चांगली करण्याच्या प्रयत्नांवर निशाणा साधला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विट केले आहे की, मि. मोदी लागोपाठ जागतिक बँक रँकिंगचा ढोल वाजत आहे. कारण, आता आकड्यांमध्ये अनियमितता आणि कार्यप्रणालीमध्ये बदलांमुळे बँकेने रँकिंग जारी करण्यास प्रतिबंध लावला आहे. या सरकारची उर्जा एका खोट्या रँकिंगवर वाया गेली आहे, कारण आपले सक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अजूनही मागे पडत आहेत.