बहुजननामा ऑनलाइन टीम –
भारत आणि चीनदरम्यान सुरु असणार्या वादावरुन राजकीय विरोधकांबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित तज्ज्ञांनाही सरकारच्या धोरणांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राष्ट्रीय सुरक्षातज्ज्ञ असणार्या ब्रह्मा चेलानी यांनी मोदी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत. ट्विटवरुन चेलानी यांनी चीनविरोधात बोलण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि भारत सरकारला कोणी अडवले आहे असा थेट सवाल केला आहे.
भारताविरोधात आक्रमकता दाखवणार्या चीनविरोधात बोलण्यापासून मोदी सरकारला कोणी थांबवले आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय नियम आणि द्विपक्षीय सामंजस्य करारांचे उल्लंघन या दोन गोष्टींबद्दल काय बोलले जात नाही असा सवाल चेलानी यांनी उपस्थित केला आहे. सरकार सैन्याशी संबंधित खर्चा शिवाय इतर खर्च वाढवण्यात इच्छुक का दिसत नाही. यापूर्वी चेलानी यांनी मोदींनी चीन करत असलेल्या खुरापतींबद्दल देशातील जनतेला स्पष्टपणे माहिती दिली पाहिजे असे म्हटले होते. संकट काळामध्ये राष्ट्रीय नेतृत्वाने आपल्या देशातील जनतेला विश्वासात घेणे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
What considerations have stopped Modi and his government from speaking up on China's aggression against India, including launching a diplomatic offensive to spotlight its violation of international norms and bilateral accords? And why the reluctance to step up non-military costs?
— Brahma Chellaney (@Chellaney) August 26, 2020