बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : एलपीजी सिलेंडरची सुरक्षा अतिशय महत्वाची आहे. नेहमी दिसून येते की, ग्राहकांच्या निष्काळजीपणामुळे मोठ्या दुर्घटना होत असतात. ग्राहकांच्या बाबतीत असे कमी माहिती असल्याने घडते. एलपीजी सिलेंडरचा वापर करताना अनेकदा अशीही वेळ येते जेव्हा सिलेंडर मोठ्या कालावधीपर्यंत विनावापर ठेवावा लागतो.
काही ग्राहकांना 6 ते 2 वर्षापर्यंत सिलेंडर विनावापर ठेवावा लागतो. अशावेळी लोकांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न असतात. जर एलपीजी सिलिंडर मोठ्या कालावधीपर्यंत विनावापर ठेवायचा असेल तर काय करायचे? हा प्रश्न अनेक ग्राहकांना पडतो, त्याचे उत्तर जाणून घेवूयात…
गॅस एजन्सीच्या वेबसाइट्सवरील माहितीनुसार, जर एखादा ग्राहक मोठ्या कालावधीपर्यंत सिलेंडरचा वापर करत नसेल तर अशावेळी सिलेंडरवरून रेग्युलेटर काढून त्याच्यावर कॅपचे सील लावले पाहिजे. यासोबतच सिलेंडर एखाद्या कोरड्या जागेत ठेवावा.
असे केल्याने सिलेंडर सुरक्षित राहतो. ग्राहकांनी सिलेंडर अशा ठिकाणी ठेवावा जिथे कोणत्याही प्रकारची आग नसेल. एलपीजी सिलेंडरमध्ये भरलेला गॅस डिग्रेड होत नाही, तसेच खराब सुद्धा होत नाही. या कारणामुळे तो मोठ्या कालावधीपर्यंत विनावापर कोणतेही नुकसान न होता ठेवता येतो.
गॅस गळती दरम्यान इलेक्ट्रिकल स्विचचा वापर करू नका आणि स्टोव्हचे नॉब बंद असल्याची खात्री करून घ्या. एक सर्वात मोठी चूक लोक नेहमी करतात आणि ती म्हणजे एलपीजी गळतीचा शोध घेण्यासाठी मॅचिसची काडी पेटवतात. अशी चूक कधीही करू नका.