बहुजननामा ऑनलाइन टीम – विधानसभा आणि नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने विश्वजीत कदम आणि अरुण लाड हे एकत्र आले. मात्र ते ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकत्र येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे पलूस तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींच्या (Gram Panchayat) होत असलेल्या निवडणुकीला (Election) विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर कदम-लाड (Arun Lad) एकत्रितपणे ग्रामपंचायत निवडणुका लढवून देशमुख (Sangram Deshmukh) गटाला शह देण्यासाठी कोणती राजनती हे दोन नेते आखणार हे पहावे लागले.
राजकारणातील संवेदनशील तालुका म्हणून पलूस तालुक्याची ओळख आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकादेखील इर्षेने लढवल्या जातात. त्यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व प्रप्त झाले आहे. कारण पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने यापूर्वी राजकारणात विरोधक असणारे कदम-लाड एकत्र आले आहेत. काँग्रेसचे (Congress) राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम (Dr. Vishwajeet Kadam) यांनी आपली संपूर्ण ताकद आमदार लाड यांच्या मागे भक्कमपणे उभी केली होती.
लाड यांच्या प्रचारात डॉ. कदम हे सहभागी झाले होते. या लाड-कदम एकत्रीकरणामुळे पलूस तालुक्यातील राजकीय समिकरणे बदलली आहेत. माजी आमदार पृथ्वीराज कदम अर्थात भाजप या बदलत्या राजकीय परिस्थितीला कसे तोंड देणार. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण यापूर्वी देशमुख लाड यांच्यामध्ये 1995 पासून सख्य होते. कदम-लाड एकत्र येण्याचा आणि लड व देशमुख यांच्यामध्ये निर्माण झालेल्या राजकीय दरीचा ग्रामपंचायत निवडणुकांवर काय परिणाम होईल ? याकडे लक्ष लागले आहे.
पलूस तालुक्यातील ग्रामपंचायत होत असलेल्या गावांची नवे व कंसात अनुक्रमे प्रभाग व सदस्य संख्या…
आंधळी (4,11), भिलवडी (6,17), भिलवडी स्टेशन (3,9), बरुंगवाडी (3,9), दह्यारी (3,7), खंडोबाची वाडी (3,9), नागराळे (4,11), नागठाणे (5,15), रामानंदनगर (6,17), सूर्यगाव (3,7), धनगाव (3,9), तुपारी (3,9), माळवाडी (5,15) यातील बहुतांश ग्रामपंचायतमध्ये काँग्रेसची सत्त आहे. तर काही ग्रामपंचायतीत भाजप, राष्ट्रवादी तर काही ठिकाणी पक्ष विरहित स्थानिक राजकारणातील गटांकडे सत्ता आहे.