नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मैं भी चौकीदार या अभियानावर ‘एमआयएम’ चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी हल्लाबोल केला आहे. पुलवामा.उरी आणि पठाणकोट हल्ल्याची आठवण करून देत तुम्ही कसले चौकीदार आहात असा सवाल केला आहे. त्याचबरोबर समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालाविरोधात वरच्या न्यायालयात आव्हान देण्याची मागणी केली. ओवेसींनी पंतप्रधान मोदी जर खरेच देशाचे ‘चौकीदार’ आहेत तर असीमानंदला निर्दोष ठरवणाऱ्या निर्णयाविरोधात सरकारने अपील करावे. असे त्यांनी म्हटले आहे.
२००७ मध्ये झालेल्या समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटात ६८ जणांचा बळी गेला होता त्यात २५ भारतीयही होते. हे कसे विसरून चालेल देशाचा चौकीदार याना न्याय देणार का? बॉम्बस्फोट हे दहशतवादी कृत्य आहे. तुम्ही कसले चौकीदार आहात ? असे ओवेसी म्हणाले. हरयाणा येथील पंचकुला येथेल एनआयएच्या विशेष न्यायालयाने बुधवारी समझोता एक्स्प्रेस बॉम्बस्फोट प्रकरणी असीमानंदसह ४ जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
मोदी देशाचे चौकीदार असतील तर त्यांनी त्वरीत न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात अपील करण्याची घोषणा करावी. तुम्ही असीमानंदला घाबरता का ? असीमानंद हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले होते. असेही ओवैसी यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.