बहुजननामा ऑनलाईन – सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुन्हा भाजपच्याच नेतृत्वाखाली एनडीए सरकार येणार असल्याचा अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीला महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला आहे.
एक्झिट पोल विषयी बोलताना आंबेडकर म्हणाले ,ज्यांना एक्झिट पोल द्यायचे होते त्यांनी दिले आहेत. ते आकडे खरे की खोटे निकालानंतर स्पष्ट होईल . २३ तारखेपर्यंत सर्वांनी थांबलं पाहिजे , याआधी अकोल्यात बोलताना मतदानोत्तर चाचणीमध्ये काहीही दाखवत असले, तरी २३ तारखेचा निकाल आपल्याच बाजूने असल्याचा दावा वंचित प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला कंटाळून भाजपाला निवडून दिले. ईव्हीएम हॅक केले जात असल्याच्या विरोधकांच्या दाव्यावर बोलताना त्यांनी सांगितलं की, ईव्हीएम हॅकिंगची शक्यता नाकारता येत नाही.‘ईव्हीएम हॅकिंग करणं कठीण नाही. कोणतंही इलेक्ट्रॉनिक आयटम हॅक होऊ शकतं. हॅक कसं होतं हे फक्त शिकलं पाहिजे. असं कोणतंही यंत्र नाही जे हँकिग होऊ शकत नाही’, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
निवडणुकीत पराभव झाल्यास कोणाला जबाबदार धरलं जाईल असं विचारलं असता त्यांनी सांगितलं की, ‘आम्ही कोणा एकावर खापर फोडणार नाही. आत्मपरिक्षण करु असेही आंबेडकर यांनी म्हंटले आहे.