मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – पुलवामामध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यात जवळपास ४४ जवान शाहिद झाले होते आता तरी भारताने पाकिस्तानला धडा शिकवत त्यांच्याबरोबरचे संबंध तोडून त्यांना अद्दल घडवावी त्यांच्यबरोबरचे आर्थिक व्यवहार, व्यापार आयात-निर्यात बंद करावी. ,तसेच त्यांना देण्यात येणारे पाणी बंद करावे. झोपपट्टीवासीयांना मूलभूत सुविधा ,पाणी ,वीज देण्यात याव्यात याबरोबरच दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे .अशा विविध मागण्यांसाठी आज (शुक्रवार )भीम आर्मीने मुंबईतील आझाद मैदानात निदर्शने करत आंदोलन केले.
भीम आर्मीचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्ता पोळ, वनिता अडसुळे यांना पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणला म्हणून ३५३ कलमानुसार सूडबुद्धीने अटक केली आहे, असा आरोप भीम आर्मीने यावेळी केला. आज महिना झाला आहे तरी अजूनही त्यांना बेल का मिळू शकलेली नाही असेही आंदोलनकर्ते म्हणाले.
चेंबूरमधील बिल्डर हे स्थानिक लोकांची गळचेपी करत असून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.असे अनेक प्रश्न घेऊन भीम आर्मीने आझाद मैदानात विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे.या मागण्या वेळीच मान्य झाल्या नाहीत तर , येणाऱ्या काळात आम्ही तीव्र आंदोलन छेडू असे भीम आर्मीचे मुंबई प्रमुख सुनील गायकवाड यांनी सांगितले आहे .