बहुजननामा ऑनलाईन टीम : क्रीडा विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम (Tulsidas Balaram Passes Away) यांचे आज निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. बलराम यांनी ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. तुलसीदास बलराम यांच्या निधनामुळे क्रीडा विश्वावर मोठी शोककळा पसरली आहे. त्यांचे बहुतांश अवयव खराब झाल्याने त्यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. तुलसीदास बलराम (Tulsidas Balaram Passes Away) यांना डिसेंबर महिन्यात पोट आणि लघवी संबंधित समस्येमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Deeply saddened to hear about the demise of Shri Tulsidas Balaram ji, the Asian Games gold medalist footballer & Olympian. He represented India in the 1956 & 1960 Olympics, leaving a lasting legacy in the world of football. My condolences to his family. pic.twitter.com/BrrGnC3dhN
— Anurag Thakur (@ianuragthakur) February 16, 2023
क्रिडा जगतावर शोककळा
26 डिसेंबर रोजी तुलसीदास बलराम यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना युरिनरी इन्फेक्शन झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. यादरम्यान त्यांच्यावर उपचार सुरु असताना गुरुवारी 16 फेब्रुवारी रोजी दुपारी अखेरचा श्वास घेतला. तुलसीदास बलराम यांच्या निधनावर (Tulsidas Balaram Passes Away) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह केंद्रीय क्रिडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी शोक व्यक्त केला आहे.
India's Asian Games gold-medal winning footballer Tulsidas Balaram dies after prolonged illness
— Press Trust of India (@PTI_News) February 16, 2023
तुलसीदास बलराम यांची कारकीर्द
दिग्गज भारतीय फुटबॉलपटू तुलसीदास बलराम 50 आणि 60 च्या दशकातील भारतातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंपैकी एक होते.
बलराम यांनी मेलबर्न येथे 1956 ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले होते.
त्या ऑलिम्पिकमध्ये भारत ४थ्या क्रमांकावर होता. फुटबॉलमधील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.
तुलसीदास बलराम यांनी 1962 साली आशियाई खेळांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक जिंकले होते.
बलराम यांनी 1960 च्या रोम ऑलिम्पिकमध्येही भाग घेतला होता.
1960 च्या रोम ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने केलेल्या तीन गोलपैकी दोन गोल बलराम यांनी केले होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Tulsidas Balaram Passes Away | tulsidas balaram legendary indian footballer passes away aged 86 famous football player and olympian tulsidas balaram
हे देखील वाचा :
Pune Crime News | घरी खेळायला आलेल्या ९ वर्षाच्या मुलीबरोबर मैत्रिणीच्या वडिलांचे अश्लिल चाळे