बहुजननामा ऑनलाईन – सोशल मीडियावर त्रिपुराचे जिल्हा दंडाधिकारी शैलेश यादव यांचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते लग्नाच्या हॉलवर धाड टाकताना दिसत आहेत. यावेळी तिथे नियमांचं उल्लंघन होताना पाहून त्यांना संताप अनावर झाला. यावेळी त्यांनी नवऱ्यामुलासह उपस्थित सर्वांनाचा अक्षरश: खेचून बाहेर काढलं. अन्य ठिकाणींही अशीच कारवाई त्यांनी केली असून नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी लग्नाच्या हॉलवर एक वर्षांसाठी बंदी घातली आहे. तसेच काही पोलिसांवर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे.
त्रिपुरामध्ये दिवसाला १०० हून अधिक कोरोनारुग्ण सापडत आहेत. मात्र रुग्णालयांना पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे त्रिपुराने अगरताला पालिका परिसरात २२ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत नाईट कर्फ्यूची घोषणा केली आहे. दरम्यान, पश्चिम त्रिपुराचे जिल्हा दंडाधिकारी शैलेश यादव यांना लग्नात कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी लग्नाच्या हॉलवर धाड टाकली. यावेळी तिथे नियमांचं उल्लंघन होताना पाहून त्यांचा संताप झाला. यादव यांनी नवऱ्यामुलासह उपस्थित सर्वांनाचा अक्षरश: खेचून बाहेर काढलं. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्याच्या सूचना केल्या.
यावेळी जिल्हा दंडाधिकारी यादव यांनी कर्तव्याचं पालन न केल्याने प्रसारमाध्यमांसमोरच पोलीस अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला. पोलीस सहकार्य करत नसल्याचे सांगत तिथे उपस्थित काही पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली जावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. यामध्ये पूर्व अगरतालाचे ऑफिसर इंचार्जही आहेत.