तीन कृषि कायदे रद्द करावी, या मागणीसाठी आज काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीत पोलीस आणि शेतकरी आंदोलक यांच्या जोरदार धुमचक्री सुरु झाली असून आंदोलकांनी बॅरिकटे तोडून(Tractor rally) दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर नेण्यास सुरुवात केली आहे. हे आंदोलन शेतकरी नेत्यांच्या हातून निसटून गेल्याचे दिसून येत आहे.
दिल्ली पोलिसांनी या ट्रॅक्टर रॅलीला परवानगी दिली होती. तसेच त्यासाठी वेळही निर्धारित केला होता. तसेच ही ट्रॅक्टर रॅली दिल्ली बाहेरच्या मार्गांवरुन नेण्याचे ठरविण्यात आले होते. पण त्याअगोदरच शेतकर्यांनी भरभक्कम बॅरिकेट तोडून त्यांनी दिल्लीच्या दिशेने ट्रॅक्टर घुसविण्यास सुरुवात केली आहे. सिंघु बॉर्डर, गाजीपूर बॉर्डरवर बॅरिकेट लावण्यात आले होते. हे बॅरिकेट तोडून शेतकरी ट्रॅक्टर रॅली सुरु झाली. तेथून दिल्ली बॉर्डर २० किमी दूर आहे. आतापर्यंत या रॅलीने जवळपास ८ किमी पुढे आले आहेत. या रॅलीत जवळपास अडीच ते तीन लाख ट्रॅक्टर सहभागी झाले आहेत. पोलिसांनी मोठमोठे कंटेनर, ट्रक लावले होते. ते शेतकरी बाजूला करुन पुढे जात आहे. ही ट्रॅक्टर परेड लाल किल्ल्यापर्यंत जाण्याचा निर्धार आहे.
गेल्या २ महिन्यांपासून शेतकरी बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. त्यामुळे आता तरुण शेतकर्यांचा सयंम सुटला असून त्यांनी पोलिसांनी दिलेला मार्ग सोडून ते लाल किल्ल्याजवळ जाण्याचा निर्धार केला आहे. दिल्ली – चंदीगड राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र ट्रॅक्टरच ट्रॅक्टर दिसून येत आहे.
ट्रॅक्टर रॅलीला रोखण्याचा पोलिसांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहे. जागोजागी पोलिसांनी या शेतकर्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. अश्रुधुराची नळकांड्या फोडल्या. तरीही जमाव मागे हटण्यास तयार नाही. त्यामुळे संपूर्ण दिल्ली बॉर्डरवर गोंधळाचे दृश्य दिसून येत आहे. पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न
इंडिया गेट सुमारे १ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी पोलिसांवर दगडफेक करण्याचे प्रकार घडले आहे. निमलष्करी दलाची पथके अनेक ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. काही ठिकाणी आंदोलक आणि पोलीस त्यांच्यात चर्चा सुरु आहे. मात्र, आंदोलक शेतकरी आता नेत्यांचे ऐकण्याच्या परिस्थितीत नाहीत. काही जणांनी ट्रॅक्टर घेऊन पुढे निघाले असून ते वाटेत थांबलेल्या पोलिसांच्या अंगावरही ट्रॅक्टर घालून पुढे जात आहेत. त्यामुळे या आंदोलनाने उग्र स्वरुप धारण केले असून पुढे काय होणार हे कोणीही सांगू शकत नाही अशी परिस्थिती आहे.