बहुजननामा ऑनलाइन टीम – जयपूर दिल्ली रोडवर ट्रक उलटून झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहाजण जखमी झाले आहेत. ही घटना राजस्थानमध्ये मंगळवारी (दि.5) सायंकाळी ब्रह्मपुरी पोलीस ठाण्याच्या(accident on Jaipur-Delhi road) हद्दीत झाली आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. भरधाव वेगात असणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या घटनेनंतर ट्रक चालकाने घटनासस्थळावरुन पळून जाण्याच्या नादात ट्रक वेगाने चालवत आणखी दोन दुचाकीस्वारांना चिरडले. धोबी घाट परिसरात हा अपघात झाला. ट्रकने तीन जणांना चिरडल्यानंतर एक डझनहून अधिक वाहनांना धडक दिली. यानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली.
जयपुर के दिल्ली रोड़ पर हुए दर्दनाक सड़क हादसे में कई लोगों की मृत्यु एवं घायल होने की खबर अत्यंत दुखद एवं दुर्भाग्यपूर्ण है। मैं ईश्वर से दिवंगत आत्माओं की शांति एवं घायलों के शीघ्र स्वस्थ होने की कामना करता हूँ।
— Sachin Pilot (@SachinPilot) January 5, 2021
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ईदगाह उड्डाण पुलाजवळ जयपूरच्या ब्रह्मपुरी येथे भरधाव ट्रक चालक वाहन चालवत होता. दरम्यान त्याने दुचाकीस्वारांना चिरडले होते. तांदळाच्या गोण्या घेऊन जाणारा मोठा ट्रक होता. प्राथमिक वृत्तानुसार राजकुमार, लालचंद आणि मोहम्मद सलाम अशी अपघातात मृत्यू झालेल्याची नावे आहेत. तर ट्रक चालक हरियाणाचा असल्याचे सांगितले जात आहे.
हा अपघात मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. त्यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ होती. लोक कामावरून घरी जाण्याच्या तयारीत होते. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी सांगितले, जयपूर-दिल्ली रोडवर या भीषण अपघातात अनेक लोक मरण पावले आणि जखमी झाल्याची बातमी अत्यंत दु:खदायक आणि दुर्दैवी आहे. दिवंगत लोकांच्या आत्म्यास शांती आणि जखमींच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा व्हावी यासाठी मी ईश्वराकडे प्रार्थना करतो.