बहुजननामा ऑनलाईन टीम : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात 1 डिसेंबर हा अनेक प्रकारे शेतकरी आणि व्यावसायिकांच्या खिशांना फरक पाडतो. असेच काहीसे आत्ताही होणार आहे. सरकारी योजना, विमा आणि टेलिकॉम क्षेत्रात काही बदल होणार आहेत, त्याअंतर्गत बरेच बदल जाणवले जातील. हे कोणते ते सविस्तर जाणून घ्या.
पंतप्रधान-किसान सन्मान निधी योजनेशी आधार जोडण्याची शेवटची तारीख आज (३० नोव्हेंबर)
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत ६००० रुपयांच्या मदतीसाठी आधार क्रमांक जोडण्याची आजची शेवटची तारीख आहे. तथापि, जम्मू-काश्मीर, लडाख, आसाम आणि मेघालयातील शेतकऱ्यांसाठी ही तारीख ३१ मार्च २०२० आहे. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे आणि त्यांनी आधार लिंक केले नसेल तर ते आज ही करु शकतात.
मोबाइल कॉल महाग होऊ शकतात
दशकाहून अधिक जुने अॅडजस्टर्ड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) बाबतीत टेलिकॉम कंपन्या कर्जाच्या दबावाखाली आहेत. याचा सामना करण्यासाठी कंपन्या टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवून ग्राहकांच्या खिशावर भर टाकू शकतात. 1 डिसेंबरपासून व्होडाफोन, आयडिया, एअरटेलसह सर्व दूरसंचार कंपन्या कॉल आणि इंटरनेट सेवा महाग होऊ शकतात.
जीवन विमा नियमात बदल
विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (आयआरडीएआय) 1 डिसेंबरपासून अनेक नियमांमध्ये बदल करणार आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, प्रीमियम काहीसा महाग असू शकतो आणि गॅरंटी रिटर्न कमी असू शकते. काही विमा कंपन्यांचे म्हणणे आहे की, प्रीमियम महाग असल्यास ग्राहकांना अधिक वैशिष्ट्यांचा लाभ मिळेल.
LIC च्या योजनेत आणि प्रस्ताव फॉर्ममध्ये बदल
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार भारतीय जीवन विमा महामंडळ 1 डिसेंबरपासून आपली योजना व प्रस्ताव फॉर्म बदलणार आहे. असे म्हणतात की, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे नवीन प्रस्ताव फॉर्म पूर्वीपेक्षा जास्त लांब आणि विस्तृत असतील.
Visit : bahujannama.com