बहुजननामा ऑनलाइन टीम – श्रीनगर, दि. 20 ऑगस्ट : ढासळती अर्थव्यवस्था आणि जनजीवन यांसह अनेक बाबींमुळे आता मोदी सरकारवर सडकून टीका केली जात आहे. यातच मोदी जे बोलतात त्यात किती तथ्य आहे? हा देखील विषय बनत आहे. त्यामुळे ‘एकही दिवस असा नाही, जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटं बोलत नाहीत’, अशा शब्दांत जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी टीका मोदी आणि केंद्र सरकारवर यांच्यावर केली आहे.
फारूख अब्दुल्ला म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर राज्याचा विशेष दर्जा परत घेण्याबाबत आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतेही संकेत दिले नाहीत. आता भारत सरकारवर कोणीही विश्वास ठेवू शकणार नाहीत. कारण, एक देखील दिवस असा नाही, जेव्हा ते (पंतप्रधान नरेंद्र मोदी) खोटे बोलत नाहीत. अर्थात मोदी नेहमी खोटं बोलतात.
फारूख अब्दुल्ला म्हणाले की, केंद्र सरकारचे हे पाऊल अनपेक्षित होते. ’एक दिवसापूर्वी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळी मात्र, जम्मू आणि काश्मीर राज्याचा दर्जा काढून घेण्याचे कोणतेही संकेत दिले नाही. राज्यात एवढ्या अधिक प्रमाणात जवान पाठविले, त्याची गरज काय आहे?, असे मी पंतप्रधान मोदी यांना विचारले. पर्यटकांनाही जम्मू आणि काश्मीर राज्यामधून बाहेर काढले होते. अमरनाथ यात्रा देखील रद्द केली होती. हे सगळे विचित्रच होते… जसे पाकिस्तान विरुद्ध युद्ध किंवा दुसरे काही तरी. आम्ही पंतप्रधानांना विचारले, मात्र त्यांनी त्यावर काहीही म्हटले नाही. त्यांनी आम्हाला वेगळ्या गोष्टी सांगितल्या.’
यावर तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय सांगायचे आहे, असे फारूख अब्दुल्ला यांनी विचारले असता ते म्हणाले, ’पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी प्रामाणिक व्हावे. त्यांनी सत्याला सामोरे जावे, अशी मी त्यांना विनंती करेन. कोणीही आता सरकारवर विश्वास ठेवू शकणार नाही. हे अशक्य आहे. ते खोटे बोलत नाहीत, असा एकही दिवस नाही.’
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीर या राज्याचा विशेष दर्जा समाप्त केलाय. त्यानंतर जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्र शासित प्रदेश केले.
मला ताब्यात घेतल्याचे कळल्यावर मला धक्काच बसला, असे एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत फारूख अब्दुल्ला म्हणाले. आम्ही नेहमी देशासोबत उभे राहिलो. जे माझ्यासोबत घडले त्याची मी कल्पनाही केली नव्हती, अशा शब्दांत फारूख अब्दुल्ला यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.