बहुजननामा ऑनलाइन टीम – देशात वाहनांच्या दळवळणात येणारे अडथळे कमी करण्यासाठी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. येणाऱ्या दोन वर्षात भारताला टोल नाक्यांपासून मुक्त करणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी( Nitin Gadkari) यांनी सांगितलं आहे. यासाठी केंद्र सरकारने Global Positioning System (GPS) मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे.
एका कार्यक्रमात बोलताना मंत्री गडकरी म्हणाले, “केंद्र सरकार रशियाच्या साहाय्याने Global Positioning System (GPS) टेक्नोलॉजीचा वापर करुन दोन वर्षात भारतातील रस्त्यांवरुन टोल नाके नाहीसे होतील. सध्या देशात कमर्शिअल वाहने ही ट्रॅकिंग सिस्टीम असलेली आहेत. त्याशिवाय सरकार जुन्या वाहनांत जीपीएस सिस्टीम टेक्नॉलॉजी लावण्यासाठी वेगाने काम करेल. जीपीएस टेक्नॉलॉजीचा वापर केल्यानंतर भारतातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे टोलचे उत्पन्न वर्षात १,३४,००० कोटींपर्यंत वाढू शकेल.”
दरम्यान, महाराष्ट्रात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नितीन गडकरी यांनी टोल प्रणाली देशात पहिल्यांदा सुरु केली होती. मागील वर्षांपासून केंद्र सरकारने वाहनांना फास्ट टॅग सक्तीचे करण्यात आले आहे. यामुळे इंधनात मोठी बचत झाल्याचे समोर आले. पण अजूनही अनेक वाहनांनी फास्ट टॅग लावलेली नाहीत.
कॅशलेस व्यवहारामुळे पारदर्शकता येईल आणि भ्रष्ट्राचारही कमी झाला आहे. फास्ट टॅगमुळे उत्पन्नात ७९ कोटींवरुन ९० कोटींपर्यंत वाढ झाली. मात्र, तरीही टोल नाक्यांच्या व्यवहारात गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत असतात. त्याच पार्श्वभूमीवर मागील काही वर्षांपासून केंद्र सरकार यावरती उपाय शोधात होते. ही नवीन प्रणाली सुरु झाली तर या सगळ्या कटकटींपासून वाहन चालकांची सुटका होईलच तसेच व्यवहारही पारदर्शपणे होतील.