बहुजननामा ऑनलाईन : जम्मू – काश्मीरप्रमाणे भारताच्या दक्षिण भागावर देखील दहशतवादी हल्ल्यांचे सावट असल्याची शक्यता भारतीय सेनेचे लेफ्टनंट जनरल एसके सैनी यांनी वर्तविली आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात माहिती दिली.
लेफ्टनंन जनरल सैनी यांनी सांगितले कि, सर क्रिक भागातून काही रिकाम्या सोडून देण्यात आलेल्या संशियत बोटी आढळल्या आहेत. त्यामुळे भारताच्या दक्षिण भागावरही दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. परंतु दहशवादी कारवायांना उलथून लावण्यासाठी तसेच प्रत्येक स्तरावर त्यांना चोख प्रतिउत्तर देण्यासाठी आम्ही नेहमीच सज्ज आहोत,’ असे देखील ते म्हणाले.
दरम्यान , केरळचे पोलीस महासंचालक लोकनात बहेरा यांनी या संदर्भात म्हंटले आहे कि, ‘भारतीय सेनेकडून दहशवादी हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आल्यानंतर संपूर्ण राज्यभरात सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यात सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेचा बंदोबस्त करण्याचे आदेशही देण्यात आले आहे.’
Lt Gen S K Saini, GOC-in-C, Army Southern Command: We've inputs that there may be a terrorist attack in southern part of India. Some abandoned boats have been recovered from Sir Creek. We're taking precautions to ensure that designs of inimical elements & terrorists are stalled. pic.twitter.com/p2gs24pAN8
— ANI (@ANI) September 9, 2019