बुलडाणा : बहुजननामा ऑनलाइन – मौजे तारडखेडा येथील ग्रामपंचायतीकडून २०१३ मध्ये नियमानुसार ठराव घेऊन बौद्ध समाजला जागा देण्यात आली होती. त्या जागेमध्ये बौद्ध समाजाने धम्मध्वजाची स्थापन केली होती. त्या जागेवर ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत धम्मध्वज लावलण्यात आला होता. परंतु तेथील काही समाजकंटकांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने बनावट कागदपत्रे तयार करून मालकी हक्क् दाखवत तेथील जागेतील कंपाऊंड व धम्मध्वज कडून फेकला. त्यामुळे दोनही समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
समाजामध्ये जाती-जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य काही समाजकंटक करीत आहेत. त्यांना वेळीच पायबंद घातला पाहिजे असे काही बुद्धिजीवी लोकांनी सांगितले. ज्या समाजकंठकांनी हे कार्य केले त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी रिपाई (ए ) गटाच्या वतीने करण्यात आली आहे. विदर्भउपाध्यक्ष संजय वाकोडे, जिल्हाकार्याध्यक्ष मुरलीधर गवई, यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना दिलेल्या एका निवेदनाद्वारे केली आहे.