जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जादा पैशासाठी अनेक महा ई- सेवा केंद्रे आणि आपलं सरकार केंद्र चालकांकडून दाखल्यासाठी अडवणुकीची भूमिका घेतली जात आहे. दाखल्यासाठी मनमानी पध्दतीने पैशाची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास किरकोळ चुका दाखवून अडवणूक केली जाते. यामुळे केंद्र चालक, महसूल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी मालामाल होत आहेत.
दाखल्यासाठी येणारा गरीब, सर्वसामान्य बेरोजगार आर्थिक अडचणीत येत आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे उद्योग, व्यवसायासाठी कर्ज मागणीसाठी गेल्यानंतर अनेक बँकातील अमराठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. यावेळी आण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिवाजी पाटील, रवी चौगुले, राजू यादव आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जादा पैशासाठी अनेक महा ई- सेवा केंद्रे आणि आपलं सरकार केंद्र चालकांकडून दाखल्यासाठी अडवणुकीची भूमिका घेतली जात आहे. दाखल्यासाठी मनमानी पध्दतीने पैशाची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास किरकोळ चुका दाखवून अडवणूक केली जाते. यामुळे केंद्र चालक, महसूल प्रशासनातील भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी मालामाल होत आहेत.
दाखल्यासाठी येणारा गरीब, सर्वसामान्य बेरोजगार आर्थिक अडचणीत येत आहे. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे उद्योग, व्यवसायासाठी कर्ज मागणीसाठी गेल्यानंतर अनेक बँकातील अमराठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे. अपमानास्पद वागणूक दिली जात आहे. यावेळी आण्णासाहेब पाटील महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शिवाजी पाटील, रवी चौगुले, राजू यादव आदी उपस्थित होते.