अमरावती : बहुजननामा ऑनलाईन – संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अजय देशमुख हे कारंजा येथे प्राचार्य असताना. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी गाजली होती. ए.पी.आय स्कोर पूर्ण नसताना देशमुख हे गैरमार्गाने प्राचार्य पदावर नियुक्त झाले होते. तसेच अन्य गंभीर प्रकरणातही त्यांची चौकशी सुरू आहे, असे पत्र स्वतः कुलगुरू डॉ. मुरलीधार चांदेकर यांनी दिले होते. असे असताना कुलगुरूंनी नेमक्या कोणाच्या दबावात देशमुख यांना अमरावती विद्यापीठातून कार्यमुक्त केले, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
कुलगुरूंनी देशमुख यांना कार्यमुक्त करताना राज्यपालांची परवानगी घेतली का ? तसेच देशमुख यांची विविध प्रकरणात चौकशी सुरू आहे, याची माहिती मुंबई विद्यापीठाला दिली का? असा सवाल विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना दिलेल्या निवेदनात विचारण्यात आला आहे. विद्यापीठातील देशमुख यांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच एका राजकीय व्यक्तीकडून त्यांची थेट मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवपदी नियुक्ती करण्यासाठी लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला असल्याचा संशय सर्व विध्यार्थी संघटनेने केली . या प्रकरणाची कुलसचिवांनी चौकशी करावी.
या गंभीर प्रकणाची कुलगुरूंनी दखल घेतली नाही तर सर्व पक्षीय विद्यार्थी संघटना तीव्र आंदोलन करतील, असा इशाराही यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राहुल माटोडे यांनी दिला.