नवी दिल्ली : वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सय्यद रियाज अहमद हा १२वी नापास असून त्याने त्याच्या अभ्यासाची पद्धत अशा प्रकारे बदलली की, तो प्रत्येक परीक्षेत अव्वलस्थानी येऊ लागला. त्याने पुढे जात एमपीएससी मध्ये दुसरा क्रमांक मिळवत रेंज फॉरेस्ट ऑफिसर झाला. ते पॅड सांभाळत त्याने यूपीएससी २०१८ मध्ये पास केली.
आता यूपीएससी प्रिलिम्सच्या परीक्षेसाठी काहीच दिवस राहिले असून अशात जे पहिल्यांदा परीक्षा देत आहेत त्यांच्याबद्दल समजू शकतो, असे रियाज अहमद म्हणाले आहेत. मी पण पहिल्यांदा प्रिलिम्स देताना काय वाचू आणि काय नको, याचा विचार करत होतो. मी अशा लोकांसोबत माझ्या ट्रिक्स शेअर करू शकतो, ज्यांना ते पण वापरू शकतात, असेही ते म्हणाले.
तसेच या शेवटच्या दिवसात नेशनल पार्क आणि वाईल्ड लाईफ सेंक्चुरी सारख्या विषयांना पुन्हा एकदा वाचून घ्यावे. लक्षात ठेवा की, तुम्ही सगळ्या विषयांना स्लॉटमध्ये विभागून वाचा. वेळेचे नियोजनही महत्वाचे असते. प्रिलिम्सच्या दरम्यान तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अहवाल वाचले पाहिजे. जसे की, इज ऑफ डूइंग बिजनेस इंडेक्स ऑफ नेशनल अँड इंटरनॅशनल बॉडीज हेही वाचून घ्या. याशिवाय सरकारी अहवालही पुन्हा एकदा वाचून घ्यावे, असे त्यांनी सांगितले.
२०१३ मध्ये सय्यदने पुण्यात राहून यूपीएससीची तयारी केली. ते म्हणाले की, मला काही माहित नव्हते. टेस्ट सीरीजबद्दल माहित नव्हते की तयारीच्या वेगवेगळ्या पद्धतींबद्दल माहित नव्हते. परत २०१४ मध्ये पहिला अटेम्प्ट केला आणि त्यात नापासही झाले.
तेव्हा विचार केला की काही नाही. २०१५ मध्ये जामियाच्या आयएसएस अकॅडमी मध्ये ऍडमिशन घेतले. पुन्हा २०१५ मध्ये प्रिलिम्स दिली. त्याच साली परीक्षेमध्ये ९३ प्रश्न केले होते. निगेटिव्हमुळे प्रिलिम्स एक मार्काने क्वालिफाई झाली नाही. तेव्हा लोकांनी प्रश्न करायला सुरुवात केली. मित्र म्हणाले की तयारी नीट नाही. तेव्हा मला माझी चूक कळली की, चुकीची स्ट्रॅटेजी वापरली आहे, असे रियाज सांगत होते.
रियाजने स्वतःची प्रिलिम्सची स्ट्रॅटेजी बनवत त्याला १२३ स्ट्रॅटेजी नाव दिले. ते म्हणाले की, १ म्हणजे ज्या प्रश्नांना घेऊन मी कॉन्फिडन्ट आहे, त्यांना पहिले करणे. २ म्हणजे ज्यात कनफ्युज आहे त्यांना पहिल्या वेळेस सोडून देतो. आणि ३ म्हणजे जे अगदीच येत नाही त्यांना पूर्णपणे सोडून देणे. १ नंतर २ ऱ्या कॅटेगरी वर येऊन सोडवत असत.