बहुजननामा ऑनलाइन टीम – नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी मागील तीन महिने आंदोलन करत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत शेतकरी आंदोलनावर आपली रोखठोक भूमिका मांडली. विरोधकांनी जरुर विरोध करावा, पण शेतकऱ्यांना नवी कायद्याबद्दल समजून सांगितले पाहिजे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी लगावला. तसेच आधी पाठिंबा दिला होता मग यू-टर्न का ? असा सवाल देखील मोदींनी शरद पवारांना विचारला आहे.
राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत असताना त्यांनी कृषी कायदे आणि आंदोलकावरु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निशाणा साधला.
Sharad Pawar ji, and those from Congress, everyone… all governments have stood for agricultural reforms. Whether they were able to do it or not, but everyone has advocated that it should be done: PM Narendra Modi in Rajya Sabha pic.twitter.com/KzVsYultim
— ANI (@ANI) February 8, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, शेतकरी आंदोलनाची खूप चर्चा झाली आहे. कशाबद्दल हे आंदोलन आहे, त्याबद्दल चर्चा झाली नाही. शरद पवार यांनी शेती कायद्यात सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी शेती कायद्यात सुधारणा करण्याचे मत व्यक्त केल. पण त्यांनी कायद्याला विरोध केला नाही. आज आम्ही चांगले विचार मांडले याचा अर्थ असा नाही की, 10 वर्षानंतर चांगले विचार असू शकत नाही. पण अचानक आज त्यांनी यू-टर्न का घेतला हे मात्र कळू शकले नाही. तुम्ही शेतकऱ्यांना सुद्धा सांग शकता की, नवीन कायदे आहे ते स्वीकारले पाहिजे, असा टोला मोदींनी शरद पवार यांना लगावला.
Manmohan ji is here, I'd read out his quote. Those taking a U-Turn (farm laws) will perhaps agree with him. "There are other rigidities because of marketing regime set up in 1930s which prevent our farmers from selling their produce where they get highest rate of return…": PM pic.twitter.com/npAfVwLHlv
— ANI (@ANI) February 8, 2021
तुम्हाला अभिमान वाटायला हवा, मोदींचा टोला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भाषणातील काही मुद्दे राज्यसभेत वाचून दाखवले. शेतकऱ्यांना पिक विकण्यासाठी स्वातंत्र्य, भारताला स्वतंत्र कृषी बाजार मिळवून देण्यासाठी मनमोहन सिंग यांनी सांगितले होते. आता त्यांनी जे सांगितले तेच आम्ही करत आहोत. उलट तुम्हाला याबद्दल अभिमान वाटायला हवा होता, असा टोला त्यांनी लगावला.
#WATCH LIVE: PM Modi replies in Rajya Sabha to the Motion of Thanks on the President’s Address.(Source: Rajya Sabha TV) https://t.co/FkIpRmd9kN
— ANI (@ANI) February 8, 2021
कुणी ना कुणी नाराज होईलच
जे लोक विरोध करत आहेत, त्यांच्या राज्यात त्यांनी याच विधेयकातून काही ना काही केलेच आहे. एका घरात जेव्हा लग्न असते तेव्हा कुणी नाराज होत असतं, तसंच देश देखील सर्वात मोठे कुटुंब आहे, कुणी ना कुणी नाराज होत असते अशी फटकेबाजी मोदींनी केली.
शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण
आंदोलन करणे तुमचा हक्क आहे, पण वयोवृद्ध शेतकऱ्यांनी तिथे बसवणे योग्य नाही. तुम्ही आंदोलन मागे घेतल्यानंतर सुद्धा चर्चा करु शकता. चर्चा करण्यासाठी मी राज्यसभेच्या माध्यमातून निमंत्रण देत आहोत. चर्चेतून मार्ग सुटणार आहे, असं अवाहनही मोदींनी केले.