गोंदिया : बहुजननामा ऑनलाईन – स्वातंत्र्यापासून ते आजतागत भारतातील भटक्या जमाती विकासाच्या मार्गापासून वंचित आहेत. त्यांना मुख्य प्रवाहात आण्यासाठी शासनानी प्रयत्न करावेत. गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली या गावात २ दिवसीय पाचव्या बिऱ्हाड परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचा रविवारी समारोप करण्यात आला. या परिषदेत इतर लोकांप्रमाणे भटक्या लोकांच्या वसाहतीत देखील शासनाने स्वच्छतेचे उपक्रम राबवावे असा ठराव पारित करण्यात आला.
संपूर्ण देशात १६ कोटी ७० लाखाच्यावर भटक्या जमातीची संख्या आहे. तर राज्यात २ कोटींच्यावर भटकी जमात वास्तव्यात आहे. या भटक्या जमातीला समाजाच्या मुख्य प्रवाहात जागा देण्यात यावी, भटके लोक ज्या गावात राहतात त्याठिकाणी त्यांना रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आधार कार्ड तयार करून द्यावे. आजही डिजिटल भारतामध्ये येथील भाटक्या विमुक्तांना सर्व कागदपत्रापासून वंचित राहावे लागते. त्यावाचून त्यांना शासनाच्या सर्व सोयीसुविधा मिळत नाहीत. या परिषदेमध्ये सर्व मागण्या पारित करून ते निवेदन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना पाठविण्यात आले.