पुणे : बहुजननामा ऑनलाईन – बऱ्यापैकी मुस्लिम समाज काँग्रेसपासून दुरावला आहे. आता फक्त समाजाचे नेते तेवढे त्यांच्याबरोबर त्यांचे गुलाम म्हणून राहिले आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसी समाज धास्तावला आहे. आरक्षणाचा पार्ट एक व पार्ट दोन १६ आणि २७ याप्रकारे आरक्षण मिळवतील अशी भीती आहे. असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केले.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेच्या निमित्ताने ते माळीनगर येथे आले होते. माळीनगर साखर कारखान्याच्या अतिथीगृहात पत्रकारांशी संवाद साधताना ते पुहे म्हणाले, काँग्रेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घटनेच्या चौकटीत आणण्यासाठी आह्माला मुदतीत आरखडा द्यावा, अशी आह्मी मागणी केली होती. पण त्यांनी तो न दिल्याने आता आह्मी त्यांच्याबरोबर न राहता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. असे आंबेडकर म्हणाले.
काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्षसंघटनेने एकत्रित येऊन निर्माण केलेल्या महाआघाडीत वंचित बहुजन आघडीने सामील व्हावे, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले, जयंत पाटील यांनी प्रथम भिडेंची साथ सोडली आहे हे जाहीर करावे. येत्या निवडणुकीत ईव्हिएम मशीनवर मतदान घेऊ नये असे विरोधी पक्षांनी ठणकावून सांगावे. अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घातला जाईल, असे निवडणूक आयोगाला सांगितले गेले पाहिजे असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
या पत्रकार परिषदेप्रसंगी माढा लोकसभेचे उमेदवार विजय गोरे ,माजी आमदार लक्ष्मण माने ,हरिदास भदे , माळी समाजाचे शंकरराव लगे ,भारिप चे जिल्हाध्यक्ष निशांत बनसोडे ,माळीनगरचे सरपंच अभिमान जगताप ,माढा मतदार संघाचे जिल्हाध्यक्ष दहशथ कांबळे ,अरुण जाधव आदी उपस्थित होते.