मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. अशात काँग्रेस राष्ट्र्वादीतील अनेक नेते भाजप-शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे यासाठी आता भाजप आणि शिवसेनेतील नेते रणनिती आखत आहे. जे नेते नव्याने पक्षात भरती झाले आहेत त्यांच्यासाठी मतदारसंघ उपलब्ध करून देण्यासाठी दोन्हीही पक्ष झटत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप-शिवसेनेत 20-25 जागांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीतील मतांची टक्केवारी आणि पक्षात झालेलं इनकमिंग या निकषांवर ही अदलाबदली होणार आहे.
वडाळा मतदारसंघातील जागा युतीत परंपरागतरित्या शिवसेना लढवत होती. परंतु विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांच्या भाजप प्रवेशामुळे ही जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. सिल्लोडची जागा भाजपकडे आहे परंतु विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशामुळे ही जागा शिवसेनेच्या ताब्यात येण्याची शक्यता आहे.
इतकेच नाही तर याच सूत्राप्रमाणे संदीप नाईक यांची ऐरोली, राणा जगजितसिंह यांची उस्मानाबाद, विद्या ठाकुर यांची गोरगाव, वैभव पिचड यांची जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. मुंबईत 4 ते 5 जागांची अदलाबदल होऊ शकते. याशिवाय भाजपातील नॉन परफॉर्मिंग विद्यामन आमदारांचा पत्ता इतर ठिकाणी कट होऊ शकतो.